दोन दिवस तुझा फोन नाही की मेल नाही…
ठरवलं होतं तुझ्यावर खूप रागावायचंसमजूत काढलीस तरी अजिबात ऐकायचं नाही तुझं…सगळं शहाणपण लांब कुठेतरी फेकून देऊन वेडा हट्ट करायचा…
मनाचा निर्धार अगदी पक्का केला…पण तुझा आवाज ऐकला…त्यातल्या प्रेमाचा सच्चेपणानिर्धाराच्या सर्व भिंती धडाधड कोसळत गेला…
तुझ्या मनात जरा डोकावून पाहिलं..आणि मला माझ्याच मनाचं प्रतिबिंब दिसलं…
आता आली का पंचाईत…तू आणि मी जर का वेगळाले राहिलोच नाही तर आता मीच माझ्यावर कसं रागावायचंय….
सांग ना…