तू असशील तर आयुष्याला अर्थ आहे
तू नसशील तर आयुष्य व्यर्थ आहे
तू असशील तर आयुष्य रम्य आहे
तू नसशील तर आयुष्यात काय गम्य आहे?
तू असशील तर आयुष्य सन्चिताचे फलित आहे
तू नसशील तर आयुष्य चुकलेले गणित आहे
तू असलास तर जीवन स्वप्नांची बाग आहे
तू नसलास तर आयुष्य जाळणारी आग आहे..
तुझ्या मनी तेच माझ्या मनी हा आजवरचा अनुभव आहे…
कारण तुझं मन जर आरसा तर माझं मन प्रतिबिंब आहे…
थोडक्यात काय…?
तर..
तुझ्या माझ्या सहवासाची गोडी अवीट आहे
तुझं माझं नातं हे पूर्णत्वाचं प्रतिक आहे….!!!